संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह डिसेंबर २०१९मध्ये मुंबईत प्रकाशित झाला आणि अवघ्या महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती संपली. त्यातील कविता तर वाचकांना भावणाऱ्या आहेतच; पण कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशींच्याच सुंदर हस्ताक्षरात या कविता लिहिलेल्या आहेत. संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असलेले आधुनिक काळातील हे पहिले पुस्तक ठरले आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही ते पुस्तक उपलब्ध आहे. यातील काही कवितांचे मिलिंद जोशी यांनी स्वतःच केलेले हे सादरीकरण..